
मुंडेंनंतरचे एक वर्ष
संपादकीय पान बुधवार दि. ३ जून २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मुंडेंनंतरचे एक वर्ष
भारतीय जनता पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नवी दिल्लीत अपघाती निधन होऊन आज बरोबर एक वर्ष लोटले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री म्हणून सूत्रे हाती घेऊन एक महिनाही पूर्ण झाला नव्हता तर ही दु:खत घटना घडली होती. राज्यातील तळागाळातील जनतेचा लोकनेता म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख करावा असे हे मुंडे बीडमधील आपल्या विजयी रॅलीसाठी जाण्यासाठी निघाले असताना त्यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या या विजयी रॅलीचे रुपांतर शोकाकुल रॅलित होणे ही एक दुदैवी घटना. भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात रुजवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. मुंडे हे अतिशय दिलखुलास नेते होते त्यामुळेच केवळ पक्षातच नाही तर विरोधी पक्षातही त्यांचे मित्र बरेच होते. कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांच्याकडे नेहमी असे. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यात भाजपाचा ब्राह्मणी चेहरा बदलून त्याला ओ.बी.सी.चा पाया तयार करुन देण्याचे काम त्यांनी केले. भाजपा त्यांनी खर्या अर्थाने तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. ते एक संघर्ष करणारे नेते अशीच त्यांची प्रतिमा होती. त्यांनी पक्षाला जसे राज्यात स्थान मिळवून देण्यासाठी संघर्ष केला तसाच पक्षांतर्गत आपले स्थान बळकट करण्यासाठीही वेळोवेळी संघर्ष करावा लागला. गडकरी यांच्याशी झालेल्या वादात त्यांची राजीनामा देण्यापर्यंत मजल गेली होती. परंतु शेवटी गोपीनाथ मुंडेसारखा मागासवर्गीयात स्थान असलेले नेता त्यांना पक्षाला पाहिजे असल्याने वेळोवेळी त्यांची समजूत काढली जाई. केंद्रात सत्ता आल्यावर राज्यात सत्ता आणण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली होती. त्यासाठी त्यांनी आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतले. त्यानंतर महायुती हे नाव खर्या अर्थाने सार्थ करण्यासाठी त्यांनी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांना सोबत घेऊन आम्ही पाच पांडव असल्याचे सांगितले. त्यांनी यातूनच कॉंग्रेस - राष्ट्रवादीचा पाडाव केल्याशिवाय राहाणार नाही, अशी घोषणा केली. मराठवाड्यातील बीड जिल्हा हा मुंडेचा गड होता. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा हे त्यांचे मुळ गाव. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि मुंडे यांनी महाराष्ट्र पिंजून काढत शिवसेनेच्या सोबतीने १९९५ मध्ये युतीची सत्ता आणली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. बीड जिल्हा परिषदेपासून त्यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली होती. मोठ्या संघर्षाने ते आमदार आणि आता केंद्रीय मंत्री झाले होते. २००९ मध्ये पक्षाने त्यांना लोकसभा लढवण्यास सांगितली आणि ते संसदेत गेले. तिथेही त्यांनी त्यांची चमकदार कामगिरी करुन दाखवली. लोकसभेत ते पक्षाचे उपनेते होते. महाराष्ट्रात केवळ भाजपचे नेते म्हणूनच त्यांनी काम केले नाही, तर राज्यात सर्वात मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार असलेल्या बीड जिल्ह्यातील कामगारांचे ते नेते होते. एका साधारण शेतकरी कुटुंबात १२ डिसेंबर १९४९ मध्ये बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा या गावी जन्मलेला हा तरुण पुढे चालून राज्यात उपमुख्यमंत्री व केंद्रात मंत्री होईल असे कुणास वाटलेही नव्हते. ११ वी पासूनच ते राजकारणाकडे ओढले गेले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी ते जोडले गेले. त्यानंतर ते भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये सहभागी झाले आणि त्यांनी पायाला भिंगरी लावत महाराष्ट्र पिंजून काढला. १९८० मध्ये भाजपचा संक्रमणाचा काळ होता. त्यावेळचे भाजपाचे व संघाचे नेते वसंतराव भागवत यांनी तेव्हा मागासवर्गाला भाजपसोबत जोडण्याचे काम सुरु केले होते. त्यांच्या या मोहिमेला माधव हे नाव देण्यात आले होते. माधव म्हणजे, माळी, धनगर आणि वंजारी. मुंडे हे वंजारी समाजाचे प्रतिनिधीत्व करीत. प्रमोद महाजन हयात असताना महाजन-मुंडे या जोडगोळीचाच शब्द पक्षात अंतिम होता. मात्र, महाजन यांची हत्या झाल्यानंतर मुंडे पक्षात एकटे पडले होते. मुंडेंनी विधानसभेची पहिली निवडणूक १९७८ मध्ये लढवली मात्र त्यांना यात यश आले नव्हते. त्यानंतर ते बीड जिल्हापरिषदेचे सदस्य झाले. उजणे जिल्हा परिषद गटातून ते निवडून आले. १९८५ मध्ये ते रेणापूर मतदारसंघातून पराभूत झाले. परंतु या पराभवाने खचून न जाता त्यांनी जोमाने काम सुरु केले आणि आपला मतदारांमध्ये पाया भक्कम केला. यातून मुंडेनी पराभव कधी पाहिलाच नाही. १९८० ते २००९ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या कामगिरीची दखल घेत पक्षाने २००९ मध्ये त्यांना दिल्लीला बोलावून घेतले आणि मुंडे केंद्रीय राजकारणात सक्रिय झाले. २००९ मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून प्रथमच लोकसभेवर निवडून गेल्यानंतर पक्षाने त्यांना उपनेते पद दिले. मुंडे जर हयात असते तर ते आता नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. कारण मुंडेंच्या नावाला विरोध करणे कुणालाच शक्य झाले नसते. कदाचित मुंडे राज्य विधानसभांच्या वेळी असते तर भाजपाला आज बहुमतासाठी जो आकडा कमी पडला होता तशी परिस्थिती आली नसती. कदाचित भाजपा स्वबळावरच सत्तेत आला असता. मुंडेंच्या जाण्याने भाजपामधील बहुजन चेहरा संपला आहे. त्यांच्या नेतृत्वाची पोकळी पुन्हा भरुन निघणार नाही.
--------------------------------------------------
--------------------------------------------
मुंडेंनंतरचे एक वर्ष
भारतीय जनता पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नवी दिल्लीत अपघाती निधन होऊन आज बरोबर एक वर्ष लोटले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री म्हणून सूत्रे हाती घेऊन एक महिनाही पूर्ण झाला नव्हता तर ही दु:खत घटना घडली होती. राज्यातील तळागाळातील जनतेचा लोकनेता म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख करावा असे हे मुंडे बीडमधील आपल्या विजयी रॅलीसाठी जाण्यासाठी निघाले असताना त्यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या या विजयी रॅलीचे रुपांतर शोकाकुल रॅलित होणे ही एक दुदैवी घटना. भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात रुजवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. मुंडे हे अतिशय दिलखुलास नेते होते त्यामुळेच केवळ पक्षातच नाही तर विरोधी पक्षातही त्यांचे मित्र बरेच होते. कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांच्याकडे नेहमी असे. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यात भाजपाचा ब्राह्मणी चेहरा बदलून त्याला ओ.बी.सी.चा पाया तयार करुन देण्याचे काम त्यांनी केले. भाजपा त्यांनी खर्या अर्थाने तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. ते एक संघर्ष करणारे नेते अशीच त्यांची प्रतिमा होती. त्यांनी पक्षाला जसे राज्यात स्थान मिळवून देण्यासाठी संघर्ष केला तसाच पक्षांतर्गत आपले स्थान बळकट करण्यासाठीही वेळोवेळी संघर्ष करावा लागला. गडकरी यांच्याशी झालेल्या वादात त्यांची राजीनामा देण्यापर्यंत मजल गेली होती. परंतु शेवटी गोपीनाथ मुंडेसारखा मागासवर्गीयात स्थान असलेले नेता त्यांना पक्षाला पाहिजे असल्याने वेळोवेळी त्यांची समजूत काढली जाई. केंद्रात सत्ता आल्यावर राज्यात सत्ता आणण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली होती. त्यासाठी त्यांनी आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतले. त्यानंतर महायुती हे नाव खर्या अर्थाने सार्थ करण्यासाठी त्यांनी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांना सोबत घेऊन आम्ही पाच पांडव असल्याचे सांगितले. त्यांनी यातूनच कॉंग्रेस - राष्ट्रवादीचा पाडाव केल्याशिवाय राहाणार नाही, अशी घोषणा केली. मराठवाड्यातील बीड जिल्हा हा मुंडेचा गड होता. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा हे त्यांचे मुळ गाव. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि मुंडे यांनी महाराष्ट्र पिंजून काढत शिवसेनेच्या सोबतीने १९९५ मध्ये युतीची सत्ता आणली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. बीड जिल्हा परिषदेपासून त्यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली होती. मोठ्या संघर्षाने ते आमदार आणि आता केंद्रीय मंत्री झाले होते. २००९ मध्ये पक्षाने त्यांना लोकसभा लढवण्यास सांगितली आणि ते संसदेत गेले. तिथेही त्यांनी त्यांची चमकदार कामगिरी करुन दाखवली. लोकसभेत ते पक्षाचे उपनेते होते. महाराष्ट्रात केवळ भाजपचे नेते म्हणूनच त्यांनी काम केले नाही, तर राज्यात सर्वात मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार असलेल्या बीड जिल्ह्यातील कामगारांचे ते नेते होते. एका साधारण शेतकरी कुटुंबात १२ डिसेंबर १९४९ मध्ये बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा या गावी जन्मलेला हा तरुण पुढे चालून राज्यात उपमुख्यमंत्री व केंद्रात मंत्री होईल असे कुणास वाटलेही नव्हते. ११ वी पासूनच ते राजकारणाकडे ओढले गेले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी ते जोडले गेले. त्यानंतर ते भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये सहभागी झाले आणि त्यांनी पायाला भिंगरी लावत महाराष्ट्र पिंजून काढला. १९८० मध्ये भाजपचा संक्रमणाचा काळ होता. त्यावेळचे भाजपाचे व संघाचे नेते वसंतराव भागवत यांनी तेव्हा मागासवर्गाला भाजपसोबत जोडण्याचे काम सुरु केले होते. त्यांच्या या मोहिमेला माधव हे नाव देण्यात आले होते. माधव म्हणजे, माळी, धनगर आणि वंजारी. मुंडे हे वंजारी समाजाचे प्रतिनिधीत्व करीत. प्रमोद महाजन हयात असताना महाजन-मुंडे या जोडगोळीचाच शब्द पक्षात अंतिम होता. मात्र, महाजन यांची हत्या झाल्यानंतर मुंडे पक्षात एकटे पडले होते. मुंडेंनी विधानसभेची पहिली निवडणूक १९७८ मध्ये लढवली मात्र त्यांना यात यश आले नव्हते. त्यानंतर ते बीड जिल्हापरिषदेचे सदस्य झाले. उजणे जिल्हा परिषद गटातून ते निवडून आले. १९८५ मध्ये ते रेणापूर मतदारसंघातून पराभूत झाले. परंतु या पराभवाने खचून न जाता त्यांनी जोमाने काम सुरु केले आणि आपला मतदारांमध्ये पाया भक्कम केला. यातून मुंडेनी पराभव कधी पाहिलाच नाही. १९८० ते २००९ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या कामगिरीची दखल घेत पक्षाने २००९ मध्ये त्यांना दिल्लीला बोलावून घेतले आणि मुंडे केंद्रीय राजकारणात सक्रिय झाले. २००९ मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून प्रथमच लोकसभेवर निवडून गेल्यानंतर पक्षाने त्यांना उपनेते पद दिले. मुंडे जर हयात असते तर ते आता नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. कारण मुंडेंच्या नावाला विरोध करणे कुणालाच शक्य झाले नसते. कदाचित मुंडे राज्य विधानसभांच्या वेळी असते तर भाजपाला आज बहुमतासाठी जो आकडा कमी पडला होता तशी परिस्थिती आली नसती. कदाचित भाजपा स्वबळावरच सत्तेत आला असता. मुंडेंच्या जाण्याने भाजपामधील बहुजन चेहरा संपला आहे. त्यांच्या नेतृत्वाची पोकळी पुन्हा भरुन निघणार नाही.
--------------------------------------------------
0 Response to "मुंडेंनंतरचे एक वर्ष"
टिप्पणी पोस्ट करा