-->
धारावी पुनर्विकासाचे मेरी गो राऊंड

धारावी पुनर्विकासाचे मेरी गो राऊंड

रविवार दि. १० जानेवारी २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
धारावी पुनर्विकासाचे मेरी गो राऊंड
---------------------------------------
एन्ट्रो- आजपर्यंत धारावीत गेल्या १२ वर्षात काहीच झाले नाही, तर आता सात वर्षात हा प्रकल्प काय पूर्ण होणार? आजपर्यंत दोन वेळा जागतिक निविदा काढण्यात आल्या आहेत. आजपर्यंत धारावीत कसलेही काम न करता केवळ १०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. सल्लागार चार वेळा बदलण्यात आले. आताही नवीन एक सल्लागार नियुक्त केला जाईल. सरकारने पहिल्या टप्प्यात २००४ साली ज्यावेळी हा प्रकल्प करण्याचे जाहीर केले होते त्यावेळी त्यासाठी ५६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आता हा खर्च २२ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आता सरकार सात वर्षात पूर्ण करणार म्हणते, यावर विश्‍वास कसा ठेवायचा? आता धारावी ही टॉवरनगरी होणार असल्यामुळे यात नेमका धारावीकरांचा विचार करण्यात आला आहे का, हा प्रश्‍न उपस्थित होतो. कारण धारावीचे पुर्नवसन हे अन्य घरांप्रमाणे नाही. धारावीतील निवासी लोकांच्या बरोबरीने तेथील घरगुती उद्योगांपासून ते अन्य उद्योगांचेही पुर्नवसन करणे गरजेचे आहे...
------------------------------------------------
आशिया खंडातील सर्वांत मोठ्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी जागतिक निविदा काढण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंजुरी दिली. धारावी पुनर्विकासाच्या २२ हजार कोटींच्या प्रकल्पासाठी सेक्टरनिहाय निविदा काढण्यात येणार आहेत. फंजिबल चटई क्षेत्रामुळे पुनर्विकासात धारावीतील रहिवाशांना ५० चौरस फूट जास्त म्हणजे ३५० चौरस फुटाचे घर मिळेल, असे जाहीर करण्यात आले आहे. सरकारने यात नवीन काय केले असा सवाल उपस्थित होतो. धारावी पुनर्विकासाचे हे भीजत घोंघडे गेली १२ वर्षे पडले आहे. गेल्या १२ वर्षातील घडामोडींवर नजर टाकल्यास फडणवीस सरकारने नवीन ते काय जाहीर केले. थोडक्यात सांगायचे म्हणजे धारावीच्या या पुनर्विकासाचे मेरी गो राऊंड सुरु आहे. जसे एखाद्या मेरी गो राऊंडमध्ये बसल्यावर काही काळाने पुन्हा तुम्ही त्याच जागेवर पन्या येता. तसेच धारावीच्या या प्रकल्पाचे झाले आहे.  
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा निवासस्थानी बुधवारी धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सचिव समितीने तयार केलेल्या निविदापत्राला एक-दोन सुधारणा सुचवून मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीमुळे धारावीच्या पुनर्विकासाला वर्षभरात सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे धारवीचा हा पुनर्विकास करुन सरकारला खरोखरीच या झोपडपट्टीत राहाणार्‍यांना इमारतीत पक्के घर द्याचे आहे की बिल्डरांची धन करावयाची आहे, असा सवाल उपस्थित होतो. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी धारावीच्या पुनर्विकासाला प्राधान्य दिले होते. त्यानुसार ४ फेब्रुवारी २००४ साली सरकारने धारावीच्या पुनर्विकासाच्या योजनेला हिरवा कंदिल दाखविला होता. यानुसार पुनर्विकास योजनेसाठी २००७मध्ये जागतिक निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु काही ना काही कारणाने यापुढे गाडे गेलेच नाही. धारावी हे मुंबई शहराचा भाग मानून त्याला विकसीत करण्यास परवानगी द्यावी अशी धारावी बचाव समितीची मागणी होती. हे जर मान्य केले असते तर प्रत्येकी एक चौरस फूट जागा धारावीवासियांना देताना विक्रीसाठी ०.७५ चौरस फूट उपलब्ध करुन देता आली असती. मात्र आता सरकार ३५० चौरस फूट धारावीवासियांना देताना ५०० चौरस फूट बिल्डरांना विकण्यासाठी देणार आहे. त्याशिवाय ३० टक्के अतिरिक्त चटई क्षेत्र दिले जाईल. यामुळे धारावीतील बांधकाम वाढणार आहे. म्हणजे धारावीत किमान २५ मजल्याचे टॉवर उभे राहातील. आता एवढे मोठे टॉवर उभे राहिल्यामुळे उंच टॉवर उभारण्याचे नियम लागू होणार आहेत. या नियमात बसवेपर्यंत विकासकाची दमछाक होणार आहे. धारावीच्या चार सेक्टरमध्ये ५९ हजार झोपड्या आहेत. पुनर्विकासात ६८ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. धारावीच्या पाचव्या सेक्टरचा विकास म्हाडा करणार आहे. धारावी पुनर्विकासासाठी जागतिक निविदा काढताना विकसक प्रत्येक सेक्टरसाठी स्वतंत्र निविदा भरू शकतो. परंतु प्रत्येक विकसकाला एकाच सेक्टरचे काम मिळेल. सरकारला सर्वाधिक प्रिमियम देणार्‍या विकसकाला पुनर्विकासाचे काम देण्यात येईल. धारावी पुनर्विकास प्रकल्प सात वर्षांत पूर्ण करण्यात येईल, असा दावा करण्यात आला आहे. धारावी झोपडपट्टीची एकूण जमीन ७ कोटी ५५ लाख १४००० कोटी चौरस फूट एवढी आहे. त्यातील पुनर्वसनाचे क्षेत्र ३ कोटी २३ लाख ६५ हजार चौरस फूट आहे. विकसकाला विक्रीसाठी ४ कोटी ३१ लाख ४४ हजार चौरस फूट जागा उपलब्ध होणार आहे. विकासकामांसाठी बोली ३०० कोटी रुपये लावावी लागणार आहे. पुनर्विकासाचा कालावधी ७ वर्षे निश्‍चित करण्यात आला आहे. आज पर्यंत गेल्या १२ वर्षात काहीच झाले नाही तर आता सात वर्षात हा प्रकल्प काय पूर्ण होणार? आजपर्यंत दोन वेळा जागतिक निविदा काढण्यात आल्या आहेत. आजपर्यंत धारवीत कसलेही कान न करता केवळ १०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. सल्लागार चार वेळा बदलण्यात आले. आताही नवीन एक सल्लागार नियुक्त केला जाईल. सरकारने पहिल्या टप्प्यात २००४ साली ज्यावेळी हा प्रकल्प करण्याचे जाहीर केले होते त्यावेळी त्यासाठी ५६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आता हा खर्च २२ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आता सरकार सात वर्षात पूर्ण करणार म्हणते, यावर विश्‍वास कसा ठेवायचा? आता धारावी ही टॉवरनगरी होणार असल्यामुळे यात नेमका धारावीकरांचा विचार करण्यात आला आहे का, हा प्रश्‍न उपस्थित होतो. कारण धारावीचे पुर्नवसन हे अन्य घरांप्रमाणे नाही. धारावीतील निवासी लोकांच्या बरोबरीने तेथील घरगुती उद्योगांपासून ते अन्य उद्योगांचेही पुर्नवसन करणे गरजेचे आहे. यापूर्वीच्या आराखड्यानुसार, प्रत्येक इमारतीत मॅझिनिन फ्लोअरवर उद्योगांना वसविण्याचा प्रस्ताव होता. आता याचा जर सरकार विचार करणार नसेल तर धारावीकरांचा या प्रकल्पाला विरोध असेल. गेल्या १२ वर्षात धारावीच्या प्रकल्पाचे मेरी गो राऊंड झाले आहे. आता देखील पुन्हा एक फेरी झाली आहे, असेच म्हणता येईल.
------------------------------------------------------

0 Response to "धारावी पुनर्विकासाचे मेरी गो राऊंड"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel