
सत्तेच्या दिशेने...
शनिवार दि. 16 नोव्हेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख-
----------------------------------------------
सत्तेच्या दिशेने...
राज्यात काही तरी अनपेक्षीत आघाडी होण्याची सर्व तयारी जोमात सुरु आहे. ही आघाडी आहे कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष व कॉँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही सेक्युलर पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापतील अशी चिन्हे दिसत आहेत. निदान सध्या त्याच्या शिवाय अन्य काही पर्याय डोळ्यापुढे नाही.
हे महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार रविवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी दिल्लीत भेटून चर्चा करणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही यथावकाश दिल्लीत दाखल होऊन सोनिया गांधी यांची सदिच्छा भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सरकार स्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याच्या स्थितीत या पर्यायाची शक्यता जास्त वाटू लागली आहे. भाजपाने देखील आपणच सत्ता स्थापन करु असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी हा विश्वास व्यक्त करणे म्हणजे त्यांनी शिवसेने सोबत सरकार स्थापन करणे. मात्र सध्या तरी शिवसेना पुन्हा भाजापाच्या सोबत सत्तेत बसेल असे काही दिसत नाही. त्यामुळे ही आघाडी अर्थशून्य असेल. भाजपासोबत आता राष्ट्रवादी जाणार नाही. त्यामुळे सध्या भाजपाला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी महाशिवआघाडी सत्तेच्या दिशेने वाटचाल करील असेच दिसते. येत्या सोमवारपासून दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात होत असून, त्याच्या पूर्वसंध्येला शरद पवार सोनिया गांधींची भेट घेऊन सरकार स्थापनेविषयी माहिती देतील. प्रस्तावित महाशिवआघाडी सरकारच्या स्थैर्यासाठी काँग्रेसने सत्तेत सामील व्हावे, अशी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला; तसेच राज्यातील काँग्रेसचे नेते आणि आमदारांनाही वाटते. त्याविषयीही पवार-सोनिया यांच्यात चर्चा अपेक्षित आहे. पवार-सोनिया बैठक रविवारी होण्याची शक्यता असून या बैठकीला राज्यातील काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सध्या किमान समान कार्यक्रम तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याला भेडसाविणार्या किमान प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हे तीन पक्ष आपला कार्यक्रम आखतील व त्यानुसार ते कार्य करतील, असे कितीही सांगितले गेले तरी प्रत्यक्ष सत्ता राबविताना येणार्या प्रश्नांची सोडवणूक करणे काही सोपे जाणारे नाही. मात्र किमान समान कार्यक्रम आखल्यास काही प्रमाणात सत्तेचा मार्ग सोपा होईल असे दिसते. केंद्रात डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारने डाव्यांचा पाठिंबा घेताना 2004 साली अशाच प्रकारे किमान समान कार्यक्रम आखला होता व त्यातून सत्ता राबविण्यात आली होती. हा प्रयोग बर्यापैकी यशस्वी झाला होता. मात्र शेवटच्या टप्प्यात डाव्यांचे अणू करारावरुन मतभेद झाले होते. असो, त्यामुळे किमान समान कार्यक्रम हा एक चांगला तोडगा ठरु शकतो. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मुंबईत झालेल्या चर्चेचा अहवाल; तसेच किमान समान कार्यक्रम आणि सत्तेच्या वाटपाविषयीच्या बोलणीतील प्रगतीची माहिती काँग्रेसचे नेते अहमद पटेल उद्या सोनिया गांधी यांना देणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा झाल्यानंतरच शिवसेनेशी सरकार स्थापनेविषयी चर्चा करायची अशी भूमिका उभय पक्षांनी घेतली होती. या तीन पक्षांचे सरकार कसे चालणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र या पक्षांनी तयार केलेल्या नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर, अन्य महत्त्वाच्या पदांचे वाटप समसमान होईल. भाजपकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरणार्या शिवसेनेसाठी ही लॉटरी असल्याचे मानले जाते आहे. अर्थात ही सर्व चर्चा आहे. त्याची अंतिम घोषणा झाल्यावरच सत्ता वाटपाचा फॉर्म्युला कळेल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदानंतर उरलेल्या खात्यांचं वाटप 16-14-12 असे होणार आहे. शिवसेनेला 16, राष्ट्रवादी काँग्रेसला 14 तर काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळणार आहेत. महत्त्वाच्या खात्यांपैकी गृहखाते राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदासह महसूल हे खाते काँग्रेसला मिळणार आहे. अर्थ व नगरविकास खातं शिवसेनेकडे राहणार आहे. सरकार स्थापनेनंतर कुठलेही वाद होऊ नयेत आणि सर्व मुद्दे आताच स्पष्ट व्हावेत, असा तिन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 105 जागा जिंकता आल्या आहेत. तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने या निवडणुकीत 54 आणि काँग्रेसने 44 जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला 3, एमआयएमला, समाजवादी पार्टीला आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पार्टी, शेकाप, मनसे, रासपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत एकूण 13 अपक्षही निवडून आले आहेत. सत्तेची ही गणिते जुळली असली तरी महाआघाडीतील सर्वच घटक पक्ष या महाशिव आघाडीत सहभागी होणार का हा देखील सवाल आहे. झाल्यास त्यांच्या वाट्याला कोणती मंत्रीपदे येणार हा देखील अनुत्तरीत प्रश्न आहे. सध्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काळाची गरज असल्याने या आघाडीचे स्वागत करणे आवश्यक ठरते.
-------------------------------------------------
----------------------------------------------
सत्तेच्या दिशेने...
राज्यात काही तरी अनपेक्षीत आघाडी होण्याची सर्व तयारी जोमात सुरु आहे. ही आघाडी आहे कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष व कॉँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही सेक्युलर पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापतील अशी चिन्हे दिसत आहेत. निदान सध्या त्याच्या शिवाय अन्य काही पर्याय डोळ्यापुढे नाही.
हे महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार रविवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी दिल्लीत भेटून चर्चा करणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही यथावकाश दिल्लीत दाखल होऊन सोनिया गांधी यांची सदिच्छा भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सरकार स्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याच्या स्थितीत या पर्यायाची शक्यता जास्त वाटू लागली आहे. भाजपाने देखील आपणच सत्ता स्थापन करु असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी हा विश्वास व्यक्त करणे म्हणजे त्यांनी शिवसेने सोबत सरकार स्थापन करणे. मात्र सध्या तरी शिवसेना पुन्हा भाजापाच्या सोबत सत्तेत बसेल असे काही दिसत नाही. त्यामुळे ही आघाडी अर्थशून्य असेल. भाजपासोबत आता राष्ट्रवादी जाणार नाही. त्यामुळे सध्या भाजपाला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी महाशिवआघाडी सत्तेच्या दिशेने वाटचाल करील असेच दिसते. येत्या सोमवारपासून दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात होत असून, त्याच्या पूर्वसंध्येला शरद पवार सोनिया गांधींची भेट घेऊन सरकार स्थापनेविषयी माहिती देतील. प्रस्तावित महाशिवआघाडी सरकारच्या स्थैर्यासाठी काँग्रेसने सत्तेत सामील व्हावे, अशी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला; तसेच राज्यातील काँग्रेसचे नेते आणि आमदारांनाही वाटते. त्याविषयीही पवार-सोनिया यांच्यात चर्चा अपेक्षित आहे. पवार-सोनिया बैठक रविवारी होण्याची शक्यता असून या बैठकीला राज्यातील काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सध्या किमान समान कार्यक्रम तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याला भेडसाविणार्या किमान प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हे तीन पक्ष आपला कार्यक्रम आखतील व त्यानुसार ते कार्य करतील, असे कितीही सांगितले गेले तरी प्रत्यक्ष सत्ता राबविताना येणार्या प्रश्नांची सोडवणूक करणे काही सोपे जाणारे नाही. मात्र किमान समान कार्यक्रम आखल्यास काही प्रमाणात सत्तेचा मार्ग सोपा होईल असे दिसते. केंद्रात डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारने डाव्यांचा पाठिंबा घेताना 2004 साली अशाच प्रकारे किमान समान कार्यक्रम आखला होता व त्यातून सत्ता राबविण्यात आली होती. हा प्रयोग बर्यापैकी यशस्वी झाला होता. मात्र शेवटच्या टप्प्यात डाव्यांचे अणू करारावरुन मतभेद झाले होते. असो, त्यामुळे किमान समान कार्यक्रम हा एक चांगला तोडगा ठरु शकतो. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मुंबईत झालेल्या चर्चेचा अहवाल; तसेच किमान समान कार्यक्रम आणि सत्तेच्या वाटपाविषयीच्या बोलणीतील प्रगतीची माहिती काँग्रेसचे नेते अहमद पटेल उद्या सोनिया गांधी यांना देणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा झाल्यानंतरच शिवसेनेशी सरकार स्थापनेविषयी चर्चा करायची अशी भूमिका उभय पक्षांनी घेतली होती. या तीन पक्षांचे सरकार कसे चालणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र या पक्षांनी तयार केलेल्या नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर, अन्य महत्त्वाच्या पदांचे वाटप समसमान होईल. भाजपकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरणार्या शिवसेनेसाठी ही लॉटरी असल्याचे मानले जाते आहे. अर्थात ही सर्व चर्चा आहे. त्याची अंतिम घोषणा झाल्यावरच सत्ता वाटपाचा फॉर्म्युला कळेल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदानंतर उरलेल्या खात्यांचं वाटप 16-14-12 असे होणार आहे. शिवसेनेला 16, राष्ट्रवादी काँग्रेसला 14 तर काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळणार आहेत. महत्त्वाच्या खात्यांपैकी गृहखाते राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदासह महसूल हे खाते काँग्रेसला मिळणार आहे. अर्थ व नगरविकास खातं शिवसेनेकडे राहणार आहे. सरकार स्थापनेनंतर कुठलेही वाद होऊ नयेत आणि सर्व मुद्दे आताच स्पष्ट व्हावेत, असा तिन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 105 जागा जिंकता आल्या आहेत. तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने या निवडणुकीत 54 आणि काँग्रेसने 44 जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला 3, एमआयएमला, समाजवादी पार्टीला आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पार्टी, शेकाप, मनसे, रासपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत एकूण 13 अपक्षही निवडून आले आहेत. सत्तेची ही गणिते जुळली असली तरी महाआघाडीतील सर्वच घटक पक्ष या महाशिव आघाडीत सहभागी होणार का हा देखील सवाल आहे. झाल्यास त्यांच्या वाट्याला कोणती मंत्रीपदे येणार हा देखील अनुत्तरीत प्रश्न आहे. सध्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काळाची गरज असल्याने या आघाडीचे स्वागत करणे आवश्यक ठरते.
-------------------------------------------------
0 Response to "सत्तेच्या दिशेने..."
टिप्पणी पोस्ट करा