-->
निषेधार्थ कृत्य

निषेधार्थ कृत्य

बुधवार दि. 26 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
निषेधार्थ कृत्य
नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर 300 नक्षलवाद्यांनी भीषण हल्ला केला. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह 25 जवान शहीद झाले असून, सहा जवान अत्यवस्थ आहेत. सुकमा जिल्ह्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध करत, हे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे निर्धारपूर्वक सांगितले. नक्षलवाद्यांचे हे कृत्य निषेधार्थ आहे. याचा संपूर्ण देशातून निषेध होत आहे. नक्षलवाद्यांचे हे हल्ले काही नवीन नाहीत. मात्र अशा प्रकारे 25 जवान एकाच वेळी शहीद होण्याची ही अलिकडच्या काळाताल पहिलीच घटना आहे. सुकमाच्या चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरकापालपासून दीड किलोमीटर दूर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी दुपारी गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर गोळीबाार केला. सुरक्षा पथकानेही पलटवार करीत गोळीबार केल्याने, दोन्ही बाजूने गोळीबाराची धुमश्‍चक्री उडाली. नक्षलवाद्यांनी या वर्षी केलेला हा अत्यंत भीषण हल्ला आहे. सोमवारी सकाळी या पथकाला गस्तीसाठी रवाना करण्यात आले होते. यात शंभर जवान होते. दुपारी 12 वाजता बुरकापाल नजीक हे पथक पोहोचताच दबा धरून बसलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. सुरक्षा जवानांनीही कणखरपणे मुकाबला करीत पलटवार केला. जवळपास तीन तास भीषण चकमक सुरू होती. हल्लेखोरांना पकडण्यासाठी या भागात अजूनही शोधमोहीम जोरात सुरू करण्यात आली आहेे. या हल्ल्याची माहिती मिळताच, दिल्लीचा दौरा अर्धवट सोडून मुख्यमंत्री रमन सिंह हे तातडीने रायपूरकडे रवाना झाले. बस्तर विभागातील कालापाथर नक्षलवाद्यांनी सुरक्षा पथकावर हल्ला केला. यानंतर लगेचच कोब्रा कमांडोज आणि इतर पथकासह घटनास्थळी जवानांचा अतिरिक्त फौजफाटा रवाना करण्यात आला. दंतेवाडास्थित अरनपूर पोलीस ठाण्यासातील कोंडपारा भागातील शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाना एक दहा किलोचा बॉम्ब आढळला. सुरक्षा दलाने तो तातडीने निकामी केल्याने आणखी एक मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दु:ख व्यक्त केले आहे. राज्यमंत्री हंसराज अहिर यांना स्थितीचा आढावा घेण्यासाठी छत्तीसगढला पोहोचलेे. हा हल्ला आम्ही आव्हानच समजतो, ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
रायपूर येथे उपचारासाठी आणण्यात आलेला जवान शेर मोहम्मद याने सांगितले की, आम्ही बंदोबस्तावर असताना 300 नक्षलवाद्यांनी आमच्या गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांत दोन महिलांही होत्या. नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. नक्षलवाद्यांनी आधी जवानांच्या मागावर गावकर्‍यांना पाठवून, त्यांचा नेमका ठावठिकाणा घेतला. नक्षलवाद्यांनी रस्ते करण्याला यातून विरोध केल्याचे स्पष्ट दिसते. नक्षलवाद्यांना रस्ते नको आहेत. याचे महत्वाचे कारण म्हणजे, त्यांना विकास नको आहे. कारण विकास झाला तर जंगलातील आदिवासी लोक सुशिक्षित होतील व मग नक्षलवाद्यांचे महत्व राहाणार नाही, ही नक्षलवाद्यांना मुख्य भीती आहे. याच भीतीपोटी त्यांनी हा हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांचे हे कृत्य निषेेधार्थ आहे.

0 Response to "निषेधार्थ कृत्य"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel