-->
भारत-चीन तणावाची कारणे

भारत-चीन तणावाची कारणे

रविवार दि. 23 जुलै 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
भारत-चीन तणावाची कारणे
-------------------------------------------
एन्ट्रो- चीनने आपली बाजारपेठ गेल्या काही वर्षात काबीज केली आहे. केवळ आपल्याच देशात नव्हे तर जगात त्यांनी हे आक्रमण केले आहे. यातून त्यांनी आपली अर्थव्यवस्था मजबूत तर केलीच शिवाय आपल्या देशात मोठी रोजगार निर्मीती केली. अर्थात हे आपल्याला करायला कोणीच रोखले नव्हते. मात्र तसे करण्याची आपल्याला कल्पना कधीच सुचली नाही. स्वस्त माल हा चीनचा सर्वात लोकप्रिय फंडा आहे. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्पूटर या इलेक्ट्रॉनिक्स कोणत्याही वस्तू जगातून घेतल्या तरी त्यातील सुटे भाग हे चीनचेच आहेत. अगदी अ‍ॅपल पासून ते जगातील कोणत्याही मोबाईल कंपन्यांमधील सुटे भाग हे चीनमध्ये निर्मीती झालेले आहेत. आज आपल्याकडे 100 टक्के भारतीय बनावटीचा एकही मोबाईल किंवा कॉम्पुटर उपलब्ध नाही. चीन आज पिन टू पियानो अशा सर्वच प्रकारच्या वस्तू केवळ भारतासाठी नव्हे तर जगासाठी तयार करते. आपण ज्याप्रकारे अमेरिकेत आय.टी. उद्योगात आक्रमण केले आहे व तेथील मोठे रोजगार काबीज केले आहेत, त्याच धर्तीवर चीनने आपली उत्पादने जगात विकली आहेत...
------------------------------------------------
सिक्कीममध्ये भारत-चीन आणि भूतान यांच्या सीमा ज्या भागात मिळतात त्या डोक्लाम भागात चीनने रस्त्यांची उभारणी सुरू केली आहे. त्याचबरोबर आशिया खंड ते युरोप जोडणारा रस्ता वन बेल्ट अँड वन रोड उभारण्याचा अब्जावधी रुपये खर्च करुन महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी आयोजित केलेल्या परिषदेवर भारताने बहिष्कार घातला. त्यानंतर चीनमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एकूणच त्यामुळे भारत व चीन या दोन देशातील तणाव वाढला आहे. हा तणाव कुठपर्यंत जाईल हे आत्ता सांगणे कठीण आहे, मात्र तणाव विकोपाला जाऊ शकतो. कारण उभय देशांकडून परस्पारंविरोधी कुरघोडी करण्याचे राजकारण सुरु झाले आहे. भारत 1960 सालचा नाही, असे भारताने दिलेले उत्तर हे फार बोलके आहे. त्याताच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत असताना चीनने भारतीय यात्रेकरूंच्या नथू ला मार्गे मानस सरोवर यात्रेवर बंदीची घोषणा केली. चीनने आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करू नये, असे निषेधाचे वक्तव्य भूतानने केले आहे. एकीकडे या घडामोडी घडत असताना भारताने चीनच्या भूमीवर अतिक्रमण केले आहे आणि त्यामुळेच त्यांचे बंकर उद्ध्वस्त केल्याचा चीनने कांगावा केला. अर्थात वादग्रस्त जागेचे सर्व तपशील अजूनही सार्वजनिक झालेले नाहीत. खरे तर सध्या ज्या जागेवरून वाद सुरू आहे ती भूतानची आहे. त्यामुळेच या प्रकरणात भूतानची भूमिका महत्त्वाची आहे. भूतान आणि चीन यांच्यामध्ये राजनैतिक संबंध गेली कित्येक वर्षे नाहीत व नजिकच्या काळात ते प्रस्थापित होण्याचीही शक्यता नाही. भूतानच्या सांगण्यानुसार, डोक्लामपासून त्यांचे लष्करी ठाणे असलेल्या झोम पेलरीपर्यंत रस्तेनिर्मितीच्या माध्यमातून चीन दबावाची रणनीती अवलंबत आहे. अशा वेळी भूतानने द्विपक्षीय करारांतर्गत भारताकडे मदत मागितली आणि त्यामुळे भूतानच्या जमिनीवर भारतीय आणि चिनी सैनिक समोरासमोर आले आहेत. दोन्ही देशांमध्ये 470 किमीची सीमारेषा आहे. 1984 पासून दोन्ही देशांत सीमाप्रश्‍नी चर्चेच्या 24 फेर्या झाल्या आहेत. 1996 मध्ये चीनने पश्‍चिम भूतानमधील 269 चौ. किमीच्या बदल्यात भूतानला पास्लुंग आणि जाकार्लुंग खोर्यातील 495 चौ. किमी जमीन देण्याची तयारी दर्शवली होती. 1998 मध्ये दोन्ही देशांत झालेल्या करारानुसार भूतानने चीनची मागणी स्वीकारली नाही आणि सीमा प्रश्‍नाची उकल होईपर्यंत मार्च 1959 पूर्वीसारखी स्थिती ठेवण्यावर सहमती झाली होती. हा करार पाहता सध्याची चीनची कृती हे त्यांच्या या कराराचे उल्लंघन करणारी आहे. 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या चीन भेटीदरम्यान सिक्कीम प्रश्‍नावर सहमती झाल्यासारखी स्थिती होती, परंतु शेवटी यातून फारसे काही चांगले निकाल हाती आलेच नाहीत. सध्याच्या भारत सरकारने अमेरिकेशी चांगली जुळवून घेतले आहे. नरेंद्र मोदी यांची गेल्या तीन वर्षातली ही पाचवी अमेरिका फेरी होती. ही बाब देखील चीनच्या सरकारला खटकली आहे. याला उत्तर म्हणून त्यांनी पाकिस्तानशी दोस्ती करण्यास प्रारंभ केला आहे. अमेरिका भारताच्या जवळ जाऊन आशिया खंडात काही विघ्न घालू शकते. अनेकदा चीनने आपली जागतिक शक्ती होण्याची इर्षा काही संपुष्टात आणलेली नाही. त्याच बरोबर भारतही महासत्ता नाही पण एक आशिया खंडातील एक महत्वाची शक्ती म्हणून कार्यरत राहाणार आहे. अशा वेळी या दोघांचे पटणे कठीण जाणार आहे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले परराष्ट्र धोरण आक्रमक केल्याने तसेच हिंदुत्ववाद्यांना चुचकारणारे केल्यामुळे चीन अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. अशा स्थितीत भारताला अस्थिर करण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील त्याची रणनिती भारताकडे नाही. एका म्यानेत दोन तलवारी राहू शकत नाही असे चर्चिले जात असले तरीही भारताने चीनला आव्हान देताना आपल्याकडील स्थितीचा पूर्णपणे अंदाज घेण्याची आवश्यकता आहे. भूतान हा भारताचा सर्वाधिक जवळचा आणि सुरक्षिततेसाठी दिल्लीवर अवलंबून असलेला मित्र आहे. त्या देशात घुसखोरी करून भारताविषयीच्या विश्‍वासार्हतेला तडा देण्याचा चीनचा उद्देश आहे. चीनने आपली बाजारपेठ गेल्या काही वर्षात काबीज केली आहे. केवळ आपल्याच देशात नव्हे तर जगात त्यांनी हे आक्रमण केले आहे. यातून त्यांनी आपली अर्थव्यवस्था मजबूत तर केलीच शिवाय आपल्या देशात मोठी रोजगार निर्मीती केली. अर्थात हे आपल्याला करायला कोणीच रोखले नव्हते. मात्र तसे करण्याची आपल्याला कल्पना कधीच सुचली नाही. स्वस्त माल हा चीनचा सर्वात लोकप्रिय फंडा आहे. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्पूटर या इलेक्ट्रॉनिक्स कोणत्याही वस्तू जगातून घेतल्या तरी त्यातील सुटे भाग हे चीनचेच आहेत. अगदी अ‍ॅपल पासून ते जगातील कोणत्याही मोबाईल कंपन्यांमधील सुटे भाग हे चीनमध्ये निर्मीती झालेले आहेत. आज आपल्याकडे 100 टक्के भारतीय बनावटीचा एकही मोबाईल किंवा कॉम्पुटर उपलब्ध नाही. चीन आज पिन टू पियानो अशा सर्वच प्रकारच्या वस्तू केवळ भारतासाठी नव्हे तर जगासाठी तयार करते. चीनमध्ये तर आपण आयात करतो त्यापेक्षाही जास्त प्रमाणात निर्यात करतो. त्यामुळे आपला माल देखील चीनी बाजारपेठेत आक्रमण करीत आहे. आपण ज्याप्रकारे अमेरिकेत आय.टी. उद्योगात आक्रमण केले आहे व तेथील मोठे रोजगार काबीज केले आहेत, त्याच धर्तीवर चीनने आपली उत्पादने जगात विकली आहेत. आपल्याकडे अमेरिकेतील कॉल सेंटर किंवा डाटा सेंटर ही भारतात चालविली जातात. त्यामुळे लाखो भारतीय तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अमेरिकेत ट्रम्प सत्तेवर आल्यावर त्यांनी अमेरिका फर्स्टची घोषणा दिल्यावर अमेरिकेत काम करणार्‍या आय.टी. उद्योगातील भारतीय अभियंत्यांपासून ते भारतातील कॉल सेंटरवर काम करणार्‍यां तरुणांच्या हृदयाचा एकच ठोका चुकला होता. अमेरिकेला या सेवा आपण कमी किंमतीत उपलब्ध करीत आहोत. त्यामुळे ते आपल्याला या सेवा करण्याची कामे देतात. शेवटी स्वस्त माल देणे हा जागतिक फंडा आहे. त्यात चीनने बाजी मारली आहे, हे मात्र आपल्याला मान्य करावेच लागेल.
------------------------------------------------------------------

0 Response to "भारत-चीन तणावाची कारणे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel